शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत पाटील यांच्याकडून फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:13 IST

कोल्हापूर : शेतकरी आंदोलनाची आग विझविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा ‘फायर ब्रिगेड’ सारखा वापर केला. चंद्रकांत पाटील यांच्या अंगात कोल्हापूरचे पाणी असल्याने त्यांच्यावर आम्ही विश्वास टाकला; पण त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली अशी टीका अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित ...

कोल्हापूर : शेतकरी आंदोलनाची आग विझविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा ‘फायर ब्रिगेड’ सारखा वापर केला. चंद्रकांत पाटील यांच्या अंगात कोल्हापूरचे पाणी असल्याने त्यांच्यावर आम्ही विश्वास टाकला; पण त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली अशी टीका अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी रविवारी कोल्हापुरात केली. आई-बापांच्या प्रश्नाचेभांडवल करायचे आणि मलिदा मिळाला की त्यांना विसरायचे हे उद्योग बंद करा, अशा शब्दांत त्यांनीशेतकरी संघटनांच्या नेत्यांवर शरसंधान साधले.डॉ. नवले म्हणाले, शेतकरी संपाची आग विझवण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी तर ‘लाँग मार्च’वेळी गिरीश महाजन यांचा वापर केला. चंद्रकांत पाटील यांच्यावर आम्ही विश्वास टाकला; पण शेतकºयांची फसवणूक केली. पाटीलसाहेब जरा जपून, देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील अनेकांना नेम धरून गार केले आहे, तुम्हालाही कधी गार करतील हे सांगता येत नसल्याचा टोलाही त्यांनी हाणला.‘लॉँग मार्च’च्या आंदोलनातून शेतकरी संघटनांनी बोध घेण्याची गरज आहे. शेतकरी आई-बापाच्या प्रश्नांचे भांडवल करायचे आणि मलिदा दिसला की त्यांना विसरायचे, लाज वाटली पाहिजे. अहंकार व स्वत:च्या राजकारणासाठी शेतकºयांच्या प्रश्नांचे भांडवल करण्याचे शुद्र राजकारण थांबवा. भाडोत्री सैन्यांवर नव्हे तरघरचे खाऊन लढाई जिंकता येते,ही शिकवण शिवाजी महाराजांनी दिली.‘स्वाभिमानी’ नाव लावणे वेगळे आणि प्रत्यक्षात जगणे वेगळे असा टोला लगावत आमदार, खासदारकी डोळ्यांसमोर ठेवून चौकात आणि चौकाबाहेर लढाई करण्याची नाटके बंद करा. राजकीय झेंडे, स्वार्थ, महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून शेतकरी जमात म्हणून एकत्र या, असे आवाहन नवले यांनी केले.मलाच उठाबशा काढायला लावल्याशेतकºयांच्या प्रश्नांसाठी सगळ्यांना एकत्र आणले, पण त्यांच्यातील मतभेद मिटवण्यात यश आले नाही. मानापमान, एकमेकांना कोपरखळ्या मारण्यात व जिरवण्यात ही मंडळी धन्यता मानतात. सगळ्यांच्या ताकदीवर सरकारला उठाबशा काढायला लावणार होतो, पण निमंत्रक म्हणून या शेतकरी नेत्यांनीच मला उठाबशा काढायला लावल्या, अशा शब्दांत शेतकरी संघटनांच्या नेत्यांचा नवले यांनी समाचार घेतला.